rashifal-2026

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?

Webdunia
सोमवार, 19 एप्रिल 2021 (09:25 IST)
प्रत्येकाची आंघोळीची पद्धत ठरलेली असते. कोणाची आंघोळ अवघ्या पाच मिनिटांमध्ये उरकते तर काहींना बराच वेळ लागतो. काहीजण आधी केस धुतात तर काही शारीरिक स्वच्छतेनंतर केसांवर पाणी ओततात.

आंघोळीदरम्यान तोंड धुवायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंघोळ करतानाच आपण चेहराही साबणाने किंवा फेसवॉशने धुवून घेतो. असे करणे चुकीचे असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे मत आहे. आंघोळीकरता वापरले जाणारे पाणी बरेच गरम असल्याने या पाण्याने चेहरा धुवू नये. 
 
शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत चेहर्याची त्वचा नाजूक असते. म्हणूनच गरम पाण्यामुळे ती खराब होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल होणे अशा समस्या निर्माण होत असल्याने आंघोळीचे पाणी तोंड धुण्यासाठी वापरू नये. पाणी जेवढे गरम तेवढी चेहर्याआची त्वचा कोरडी पडण्याचा धोका जास्त असतो. चेहर्याची त्वचा गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने पिगेंट्‌स स्रवणचे प्रमाण वाढते. त्वचेचा रंग बदलण्याचा धोकाही असतो. त्वचेचा पाण्याशी  जास्त संपर्क येणे हे सुद्धा आंघोळीदरम्यान तोंड न धुण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. आंघोळीचा वेळ कमी करणे गरजेचे आहे. फक्त पाच ते दहा मिनिटात आंघोळ उरकायला हवी. त्यामुळे शक्यतो  बेसिनमध्ये तोंड धुवा. असे केल्याने आंघोळीचा वेळ कमी होतो आणि त्वचेचा पाण्याशी फार संपर्क येत नाही. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी आंघोळ लवकरात लवकर आटपा. दिवसातून फक्त एकदा कोमट पाण्याचे आंघोळ करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी पारंपारिक आणि खास पाककृती

सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

चिंता करणे थांबवण्यासाठी Scheduled Worry Time पाळा

पुढील लेख
Show comments