Dharma Sangrah

'ळ' अक्षर नसेल तर.....

Webdunia
'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!
 
आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!
 
'ळ' अक्षर नसेल तर
 
पळणार कसे
वळणार कसे
तंबाखू मळणार कसे
दुसर्‍यावर जळणार कसे
भजी तळणार कशी
सौंदर्यावर भाळणार कसे
 
पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी
 
तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालणार
खुळखुळा कसा देणार
घड्याळ नाही तर 
सकाळी डोळे कसे उघडणार ?
घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार
वेळ पाळणार कशी ?
मने जुळणार कशी ?
खिळे कोण ठोकणार ?
 
तळे भरणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी
हिवाळा,उन्हाळा, पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा !
 
कळी कशी खुलणार ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा, शाळा मैत्रिणींच्या 
गळ्यात गळा
सगळे सारखे, कोण निराळा?
 
दिवाळी, होळी सणाचे काय ?
कडबोळी,पुरणपोळी 
ओवाळणी पण नाही ?
 
तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?
 
भोळा सांब ,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर 
कुठून रामनाम ?
 
मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?
 
निळे आकाश,
पिवळा चाफा
माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !
 
नारळ, केळ, जांभूळ, आवळा,
 
नवर्‍याला बावळट बोलणार कसे
 
काळा कावळा, 
पांढरा बगळा
 
ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा
 
अळी मिळी गुपचिळी,
बसेल कशी दांतखिळी?
 
नाही भेळ, 
नाही मिसळ
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ
 
पोळ्या लाटल्या जाणार नाहीत 
टाळ्या आता वाजणार नाहीत !
जुळी तीळी होणार नाहीत !
बाळंतविडे बनणार नाहीत !
तळमळ कळकळ वाटणार नाही !
काळजी कसलीच उरणार नाही !
 
पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,
 
काळ आला होता पण वेळ आली नव्हती
 
पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

नवर्‍याला मिळाला अलादीनचा चिराग

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच मौन सोडले, स्वतंत्र प्रार्थना सभा का आयोजित केल्या गेल्या हे स्पष्ट केले

पुढील लेख
Show comments