Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दृष्टिकोण

ऋचा दीपक कर्पे
"काय ही आजकालची मुलं! तरुण वयातच ह्यांची गुडघी काय दुखतात, कंबर काय अखडते! सकाळी उठून भराभरा कामाला लागायचं ते तर कुठेच गेलं...सतत बाम चोळत राहतात नि गोळ्या खात राहतात. तरी आमच्यासारखी कबाडकष्ट करावी लागली नाहीत. न धुणं न भांडी न केरवारा.." बागेत बाकावर बसल्येल्या आजीबाई आजोबांसोबत बोलत होत्या."
 
अगं काळ बदलत चालला आहे. आजकालची मुलं मेहनतीची कामं कमी करतात. त्यांचं जीवन यांत्रिक झालं आहे. सगळ्या कामांसाठी मशीनी आहेत. पायी चालायला नको, जीने चढा-उतरायला लिफ्ट असते. एक बटण दाबलं की सारी कामं होतात. सादा टीव्ही चा आवाज जरी वाढवायचा असेल तरी रिमोट आहे!!" आजोबा उत्तरले."
 
हो न! आपण निदान तो लैंड लाईन फोन वाजला की कसे धावात जायचो ..आता तर चोविस तास तो मोबाईल हातातच असतो." 
 
"सारं जग रिमोट मय झालंय. काही वर्षानंतर तर लोकं एका जागेवरून हलणार सुद्धा नाही, सारे काम बसल्या जागेवरूनच करतील का कोण जाणे!!" आजोबांच्या बोलण्यात एक काळजी होती.
  
त्याच बागेत व्हीलचेअर वर फिरायला आलेली ती मात्र हा संवाद ऐकून सुखावली. एक सोप्पं आणि आत्मनिर्भर भविष्य तिच्या डोळ्यात तरंगत होते. 
 
©ऋचा दीपक कर्पे

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

Corn Chaat: रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चाट घरी सहज बनवा,रेसिपी जाणून घ्या

टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच फेस क्रीम बनवा

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात कच्च्या कांद्या खाण्याचे फायदे जाणून घ्या

कंबरेला आकार देण्यासाठी ही योगासने करा

पुढील लेख
Show comments