* इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते. * रायतं बनवताना त्यामध्ये मीठ नंतर घाला रायतं आंबट होणार नाही. * तिखटाच्या डब्यात किंवा बरणीत हिंग घालून ठेवा तिखट खराब होणार नाही. * मूग, मोठं किंवा हरभरे मोड आणताना त्याला एका सूती कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवा, असं केल्याने त्यात आंबूस वास येणार नाही. * साखरेच्या डब्यात चार ते पाच लवंगा टाकून ठेवा या मुळे त्यात मुंग्या होणार नाही . * मेथीच्या भाजीचा कडवटपणा दूर करण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवा मेथीचा कडवटपणा नाहीसा होईल. * दुधापासून खवा करताना गॅस मोठा करावा खवा पांढरा बनेल. * मटार भाजीत घातल्यावर दाणे टवटवीत राहण्यासाठी पाण्यात एका चमचा साखर घालून मटार उकडवून घ्या आणि ग्रेव्ही घालताना पाण्यासह घाला. * खीर करताना दूध पातळ आहे किंवा कमी आहे त्यात थोडेसे तांदूळ वाटून घाला. * कस्टर्ड करताना साखरेसह मध घाला त्याची चव दुप्पट होईल.