Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips : एंगेजमेंट झाल्यानंतर चुकूनही या चुका करू नका, नातं तुटू शकते

Webdunia
शनिवार, 11 डिसेंबर 2021 (21:25 IST)
लग्नाचे बंधन जेवढे घट्ट असते तेवढेच नाजूक लग्नाच्या सुरुवातीचे दिवस असते. दोन व्यक्तींमधील नाते जोडल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात येतात . हा केवळ वधू आणि वर यांच्यातील समजूतदारपणाचा एक महत्त्वाचा काळ नाही तर दोन्ही कुटुंबांसाठी देखील असतो. नातेसंबंध जुळल्यापासून ते लग्नापर्यंत अनेक विधी असतात. पहिलाच समारंभ ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा एकत्र येतात तो काळ म्हणजे एंगेजमेंट. एंगेजमेंट किंवा साखरपुडा ते लग्न यादरम्यानचा काळ हा सुवर्णकाळ मानला जातो. हाच तो काळ असतो जेव्हा मुलगा आणि मुलगी यांना  एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. दोघेही लग्नाआधी आपापल्या नात्यात सहजतेने राहण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा सहज  राहण्याच्या नादात ते अनवधानाने चूक करतात की लग्नही मोडते. एंगेजमेंट नंतर, जर आपण लग्नाचा दिवस येण्याची वाट पाहत असाल तर,साखरपुडा झाल्यावर थोडे सावध राहा. काही निष्काळजीपणा किंवा चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत.नाही तर नाते तुटून  लग्न मोडू शकते.
 
1 हक्क गाजवणे- बऱ्याच वेळा एंगेजमेंट नंतर मुलं आपल्या होणाऱ्या जोडीदारावर हक्क गाजवतात. ते असे वागतात जणू ती त्यांची  बायको आहे. आणि ते मुलीवर हक्क गाजवू लागतात. लक्षात ठेवा की आपली एंगेजमेंट झाली आहे लग्न नाही. सध्या मुलगी तिच्या वडिलांच्या सानिध्यात आहे, त्या मुळे ती स्वतंत्र आहे. तिच्यावर आपले हक्क गाजवू नका. मुलींना असे वाटते की लग्नानंतर पती त्यांच्या भावना समजून घेणार नाही. आणि नातं तुटायला वेळ लागणार नाही. 
 
2 जास्त भेटी होणे -एंगेजमेंट नंतर मुलगा -मुलगी एकमेकांना भेटू लागतात. ओळख वाढवू लागतात. परंतु जास्त भेटणे त्यांच्यासाठी योग्य नाही. असं केल्याने आपल्या कडून असं काही घडू शकते ज्यामुळे आपलं नातं संपुष्टात येऊ शकते. 
 
3 फ्लर्ट करणे- काही मुलांची सवय असते फ्लर्ट करायची . ही सवय त्यांची एंगेजमेंट झाल्यावर देखील जात नाही. आपल्या होणाऱ्या जोडीदाराला आपली ही फ्लर्ट करण्याच्या सवयी मुळे राग येऊ शकतो. आपली छवी त्यांच्या समोर खराब होऊ शकते. आणि आपले नाते तुटू शकते. 
 
4 जोडीदाराला सन्मान द्या-प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराकडून आदराची अपेक्षा असते. एंगेजमेंट झाल्यावर दोघं बोलायला सुरुवात करतात. या दरम्यान, जर आपले बोलणे आणि वागणे असे असेल की आपल्या होणाऱ्या जोडीदाराला असे वाटेल की आपण  तिचा आदर करत नाही, तर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि नातं तुटेल. म्हणून आपल्या होणाऱ्या जोडीदाराला सन्मान द्या. 
 

संबंधित माहिती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments