Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips : सुरुवातीच्या काळातच नात्यात ब्रेकअप होण्यासाठी या सवयी जबाबदार असतात

Relationship Tips : सुरुवातीच्या काळातच नात्यात ब्रेकअप होण्यासाठी या सवयी जबाबदार असतात
Webdunia
बुधवार, 15 डिसेंबर 2021 (20:42 IST)
प्रेमाची सुरुवात नेहमी दोन लोकांमधील परस्पर समज आणि विश्वासावर अवलंबून असते. पण काही लोकांचे नाते सुरुवातीच्या काळातच तुटल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. असे लोक नेहमी दुखी असतात. त्यामुळे असे का होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण नाते तुटणे ही जोडीदाराची चूक मानत असाल तर नक्कीच एकदा स्वतःचा विचार करा. कारण कधी-कधी अनेक सवयी नात्यात ब्रेकअप होण्यासाठी कारणीभूत असतात.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मेसेज करा- जोडीदाराची काळजी घेताना वेळोवेळी फोन कॉल किंवा मेसेज करणे खूप गरजेचे आहे. कारण अनेक वेळा कामाच्या व्यस्ततेमुळे हे करता येत नाही. त्यामुळे जोडीदारावर चुकीचा प्रभाव पडतो आणि त्यांना असे वाटते की आपल्याला त्यांची   काळजी वाटत नाही. अशा स्थितीत जोडीदाराशी वेळोवेळी मेसेजद्वारे बोलणे गरजेचे आहे.
 
2 वेळ द्या- आपण नुकतेच नातेसंबंध जोडले असल्यास, आपल्या जोडीदारास भेटण्यासाठी वेळ द्या. मित्र किंवा कुटुंबासह बाहेर जाण्याव्यतिरिक्त जोडीदारासाठी वेळ काढणे केव्हाही चांगले. असे न केल्याने अनेकदा गैसमज होऊन ब्रेकअप होते. 
 
3 मोकळेपणा द्या- पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात जास्त फोन कॉल्स किंवा मेसेज करून ढवळाढवळ करत असाल तर हे देखील ब्रेकअपचे कारण बनू शकते.त्यांना मोकळीक देणे आवश्यक आहे. 
 
4  फोनचा अति वापर करणे टाळा - जर काही लोकांची सवय असते की जोडीदारा पेक्षा फोन जास्त आवडत असेल तर काळजी घ्या. अशा लोकांचे ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त असते. कारण जेव्हाही आपण जोडीदारासोबत बसण्यासाठी वेळ काढता आणि बोलण्या ऐवजी फोनवर असता किंवा सतत कॉलवर असता, तेव्हा नात्यावर नकारात्मक परिणाम होऊन ब्रेकअप होऊ शकतो.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात काकडीचे सेवनाचे फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

Relationship Tips: या चुकांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो

पुढील लेख
Show comments