Dharma Sangrah

2.22 टक्के कमी पाणीसाठा; मुंबईकरांसाठी 103 दिवसांचे पाणी

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (07:56 IST)
२.२ percent less water storage मुंबईला दररोज होणारा ३,८५० दशलक्ष पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील १०३ दिवस पुरेल इतका आहे. मात्र सध्या दहा टक्के पाणीकपात सुरू असल्याने त्याप्रमाणे निष्कर्ष काढल्यास सदर पाणीपुरवठा हा पुढील ११५ दिवस पुरेल इतका आहे. मात्र गतवर्षी याच दिवसापर्यंत सात तलावांत मिळून ७,२८,३८६ दशलक्ष लिटर (५०.३२ टक्के) इतका पाणीसाठा होता.
 
त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत ३,२८,१४५ दशलक्ष लिटर इतका (२२.६७ टक्के) पाणीसाठा कमी आहे.
मुंबई शहराला मुंबईतील विहार व तुळशी या अगदी छोट्या क्षमतेच्या दोन तलावांतून आणि १५० किमी दूर अंतरावरील ठाणे जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या पाच तलावांतून असे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर रोजीपर्यंत सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते.
 
पाऊस उशीरा सुरु झाल्याचा फटका
मात्र यंदा पावसाचे आगमन २४ जून रोजी उशिराने झाले. त्यातही अपेक्षित पाऊस पडत नसल्याने तलावांतील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत झालेली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत २२.६७ टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबई महापालिकेने तलावातील पाणीसाठचा आढावा घेऊनच १ जुलैपासून मुंबई व मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो त्या ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिका क्षेत्रातही १० टक्के पाणीकपात लागूं केली.
 
सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –
———————————————————-
तलाव        पाणीसाठा          टक्केवारी
————- ———— —————————-
उच्च वैतरणा  ८,२२०              ३.६२
 
मोडकसागर  ६७,६२६           ५२.४५
 
तानसा        ७५,९२०            ५२.३३
 
मध्य वैतरणा  ७५,१८८            ३८.८५
 
भातसा      १,५५,४८०            २१.६८
 
विहार        १२,५२६              ४५,२२
 
तुळशी         ५,१८३             ६४.४१
———————————————————-
एकूण
२०२३           ४,००,१४१           २७.६५
२०२२            ७,२८,२८६          ५०.३२
– — —– – ———————-
कमी पाणीसाठा ३,२८,१४५       २२.६७

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments