Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (16:55 IST)
कोणत्याही कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी गद्दार किंवा देशद्रोही ठरत नाही. आंदोलकांवर अश्याप्रकारचे लेबल लावणे चूकीचे आहे, असे मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुधआरीत नागरीकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी म्हटले आहे. सीएए विरोधात शातंतापूर्ण मार्गाने आदोंलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे म्हणून ते दडपून टाकता येणार नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.  सीएए विरोधी आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याच्या विरोधात न्यायालयात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे मत व्यक्त केले आहे.
 
सीएए व एनआरसीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी इफ्तिकार जखी शेख यांनी परवानगी मागितली होती. माजलगावातील जुन्या ईदगाह मैदानात हे आंदोलन करण्याची त्यांची योजना होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत बीड जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्याचाच आधार घेत माजलगाव शहर पोलिसांनीही निदर्शनांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकारी व पोलिसांचा हा आदेश रद्द केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केली, समाजासाठी एक इशारा

LIVE: राज्यात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

केंद्र सरकारने डिलिव्हरी बॉयजबाबत एक मोठा निर्णय घेतला; आता १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, सरकारने डेडलाइन काढून टाकली

वृद्ध पालकांची काळजी घेतली नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या १० टक्के रक्कम कापली जाऊ शकते; तेलंगणाच्या काँग्रेस सरकारचा निर्णय

दिल्ली विमानतळ सहा दिवसांसाठी बंद राहणार; विमान आणि प्रवाशांवर होणार परिणाम?

पुढील लेख
Show comments