Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांनी दिला लॉक डाऊन चा इशारा

Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:21 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे,परंतु अद्याप कोरोना संपलेला नाही.तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही आहेच.नागरिकांची गर्दी वाढत राहिली तर  राज्यात तिसरी लाट येईलच आणि तिसरी लाट आली आणि राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा झाला तर पुन्हा लॉक डाऊन लावण्यात येईल.असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
 
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महानगर पालिका सज्ज आहे.मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले आहे.त्या कोविड सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी ते बोलताना म्हणाले,की ऑक्सिजन च्या साठ्यात वाढ झालेली नाही.ज्या वेळी तिसरी लाट येईल आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवेल अशा स्थितीत ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात लॉक डाऊन लागू शकतो. 
 
सध्या इतर देशात कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये वाढत आहे.आपण आपल्याकडे हा संसर्ग पसरू नये या साठीची काळजी घेत आहोत.जर मुलांना कोरोनाची लागण लागली तर मुलांसाठी हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.या कोविड सेंटर मध्ये लहान मुलांना अववडेल असे वातावरण तयार केले आहे .या सेंटरला बालवाडीचं स्वरूप दिले आहे.या सेंटर मध्ये मुलांसाठी खेळणी आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध केली आहे.
 
लोक अद्याप ही गर्दी करत आहे.आपले अर्थचक्र सुरळीत सुरु राहावे या साठी कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहे. लोक गर्दी करतात हे चुकीचे आहे.असच राहिले तर कोरोनाची तिसरी लाट लवकरच येईल.आपला आणि इतरांचा जीव धोक्यात येईल असं काहीही करू नका.अन्यथा कोरोनाची तिसरी लाट आल्यावर लॉक डाऊन लावावा लागू शकतो.काळजी घ्या कोरोनाच्या नियमांचं कॅंटेकोर पालन करा.सामाजिक अंतर राखा,मास्क लावा,सेनेटाईझर चा वापर आवर्जून करा.असे आवाहन मुख्यमंत्र्यानी जनतेला केलं. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख