Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे, दादरला मनसेचा ‘गनिमी’ कावा करीत मध्यरात्रीच फोडली दहीहंडी

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (16:08 IST)
कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी करता येणार नाही. शासनाने दहीहंडीला मनाई केली आहे. मात्र, त्याला मनसेने विरोध करत ठाणे, दादरला गमिनी कावा करीत मध्यरात्रीच मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली.ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनसेचे जिल्हा प्रमुख संदीप पाचंगे आणि मनसे सैनिकांनी मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली.मुंबई व ठाण्यात अनेक ठिकाणी मनसेने कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून दहीहंडी (MNS Dahi Handi) फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
 
ठाण्यातील नौपाडा येथील मनसेच्या मुख्य कार्यालयात देखील मनसे सैनिकांनी दहीहंडी फोडली. वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात दहीहंडी फोडताना मनसेचा झेंडा हातात घेऊन सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबई, ठाण्यामध्ये मध्यरात्रीनंतर दहीहंडी उभारुन सकाळनंतर दहीहंडी उत्सव सुरु होतो. ठाण्यातील नौपाडा येथील भगवती मैदानात दहीहंडी साजरी करणारच असा इशारा सोमवारी दिला होता.पोलिसांनी मैदानात उभारण्यात येत असलेला मंडप काढायला सांगितला होता. यावेळी मनसे नेते आणि पोलीस यांच्यात काही वेळ वादावादी झाली होती.पोलिसांनी मनाई केली असतानाही मध्यरात्री १२ वाजता मनसेने अचानक दहीहंडी उभारुन ती मानवी मनोरे उभारुन दहीहंडी फोडली.त्यानंतर पोलिसांनी काही मनसे सैनिकांना पोलिसांनी अटक केली.त्यानंतर त्यांना पहाटे जामिनावर सोडण्यात आले.दहीहंडी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली असल्याने मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments