Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (22:17 IST)
परमबीर सिंग यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाला घेऊन भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  
 
आज परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले होते की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, या पत्र बाबत कळतातच राज्यात खळबळ उडाली आहे. या वर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकार धक्कादायक असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ आपल्या पदावरून राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारावा. तसेच या प्रकरणांकडे दुर्लक्ष न करता योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.  
या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा कडून कसून चौकशी व्हावी. आणि घडलेल्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे ही फडणवीस म्हणाले.  
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments