Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत आगामी 3 दिवस जोरदार पाऊस; प्रशासनाकडून ‘त्या’ इमारती रिकाम्या करण्याचा आदेश

Webdunia
बुधवार, 9 जून 2021 (08:19 IST)
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील दक्षिण, उत्तर, पश्चिमच्या काही भागात पावसाने हजरी लावली आहे. आता मात्र मुंबईत पावसानं आज सकाळपासून जोर धरला आहे. तर आगामी आणखी 3 दिवस मुंबईमध्ये जोरदार मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या तीन दिवसाच्या यांच्या जोरदार पावसामुळे काहीही हानी होऊ शकते. म्हणून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा आपत्ती विभागाने दिला आहे.
 
मुंबईसह महाराष्ट्रात आज विविध जिल्ह्यात ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, भारतीय हवामान विभागाने आगामी तीन दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
म्हणून दक्षतेचा मार्ग म्हणून मुंबईतील जीर्ण झालेल्या, मोडखळीस आलेल्या इमारती मोकळ्या करण्याचा आदेश देखील हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मुंबईकरांची स्थिती चिंताजनक होताना दिसते.
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुण्यापासून अलीबाग आणि रायगडपर्यंत धडक मारली आहे.
तसेच, आता 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सूनच आगमन दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक जयंता सरकार यांनी दिलीय.
या दरम्यान, मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 11, 12, 13, 14 आणि 15 जून रोजी शहरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याचप्रमाणे मुंबईत आजही अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments