Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो: पालकमंत्री अस्लम शेख

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:53 IST)
महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आली असून फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे आणि याच पार्श्वभूमी रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
 
अस्लम शेख यांना सूचक वक्तव्य करत म्हटले की लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आणि म्हटले की तरी लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. त्यांनी म्हटले रुग्णसंख्या वाढत आहेत, आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही जेथे याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे त्या हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आहे. रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यास मनाई आहे. तसेच लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असली तरी तेथे शेकडो लोक पोहचत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये यासाठीच हा प्रयत्न आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments