Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई हायकोर्टाचा लोकल प्रवाशांसाठी लससक्तीच्या आदेशावर राज्य सरकारला सवाल

Mumbai High Court questions state government over order for local passengers to be vaccinated मुंबई हायकोर्टाचा लोकल प्रवाशांसाठी लससक्तीच्या आदेशावर राज्य सरकारला सवाल Marathi Mumbai News  iN Webdunia Marathi
Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (19:03 IST)
राज्यात कोरोनाचे प्रकरण कमी होत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे आता कोरोनासाठीचे लावण्यात आलेले निर्बंध देखील कमी होत आहे. राज्यात लोकल प्रवासाबाबत राज्य सरकार ने लोकलने प्रवास करण्यासाठी दोन डोस घेणे बंधनकारक केले होते. अन्यथा प्रवासाला परवानगी मिळणार नाही.

लोकलने प्रवास करण्यासाठी प्रवासानी लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले होते. टास्क फोर्स ने दिलेल्या मार्गदर्शन नियमावलीनुसार, राज्य सरकारने लोकलमध्ये प्रवासासाठी दोन डोस बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण टास्क फोर्सच्या नियमावलीत असं काहीही उल्लेख नसल्याचे उघडकीस आले आहे.

त्यामुळे हायकोर्टाने राज्यसरकारला लस सक्तीच्या आदेशावर सवाल केला आहे. दोन डोस न घेतलेल्या लोकांना प्रवास बंदीचा निर्णय कधी मागे घेणार ? असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केला आहे. राज्यसरकारने दोन डोस घेतल्याशिवाय लोकलने प्रवास करता येणार नाही. त्यासाठी दोन डोस घेणे बंधन कारक केले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

त्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. दोन डोस लावण्याच्या निर्णय कधी मागे घेणार असे देखील हायकोर्टाने विचारले आहे. तसंच हा अध्यादेश मागे घेणार की नाही हे देखील कळवावे. मुख्य सचिवाने या मुद्यावर उद्या अडीच वाजे पर्यंत या बाबतीत खुलासा सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments