Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:33 IST)
मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली. मात्र केंद्र सरकार आणि लस उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून मुंबईतील शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने मुंबई महापालिकेला अधूनमधून लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे.
 
कोविड – १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
 
दरम्यान आज मुंबईत गेल्या २४ तासांत २८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार ६५९वर पोहोचले आहेत.यापैकी आतापर्यंत १५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १२ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments