Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेडणेकर उत्तर देतांना म्हणाल्या हिंदुत्व काय असतं ते आम्हाला शिकवू नका

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:04 IST)
भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला असा विरोध होणे दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्गीतेच पठण करायचे नाही, मग फतवा-ए-आलमगिरीचे पठण झाले पाहिजे का? असा सवाल केला होता. याचे उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या का, हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणल जातंय. हिंदुत्व काय असतं ते आम्हाला शिकवू नका. हिंदुत्व हे सारखं तोंडाने बोंबलून सांगण्यासारखे नाही.
 
‘हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणतायत. गीता ही सर्वोच्च आहे. ज्यावेळेला मी मधल्या पॅसेजमध्ये होते, त्यावेळेला गीता कोळी माझ्याकडे धावत धावत मागे आल्या. गीता घ्या, गीता घ्या, मी गीता आणली आहे, असे म्हणाल्या. अर्थातच त्या गीतेच उच्च स्थान आमच्या हृदयात नव्हे तर आमच्या कर्मात आहे. म्हणून मी त्या मधल्या पॅसेजमध्ये नमस्कार केला आणि त्यानंतर ग्रंथ घरी घेऊन गेले. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव अद्याप महानगरपालिकेच्या पटलावर नसतानाही चर्चा करणे योग्य नाही. याचे राजकारण करण्यासाठी लहान मुलांनाही सोडले जात नाही. या राजकारणातून तुम्ही नक्की तरुण पिढीला काय संस्कार देताय हे कळतंय. त्यामुळे या गोष्टीवर यानंतर मी बोलणार नाही. प्रस्तावाच आला नाही, फक्त पत्र दिलं, फोटो काढले आणि व्हायरल केले, अशा पद्धतीने चर्चेत राहतायत,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments