suvichar

मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेली लावली

Webdunia
सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (07:43 IST)
शनिवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेली लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलसा मिळाला आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी रात्री रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.     

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments