Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्रवीर सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे -चंद्रकांत पाटील

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (18:54 IST)
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 'सावरकर एक गौरव गाथा' या ऑनलाईन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.या वेळी ते म्हणाले की, स्वातंत्रवीर विनायक दामोदर यांनी सामाजिक समतेसाठी कृती करून आपले थोर विचार मांडले.सध्या गरज आहे त्यांचे हे थोर विचार लोकांपर्यंत पोहोचण्याची.
 
ते म्हणाले की,अंदमानच्या तुरुंगवास भोगल्यावर त्यातून सुटका झाल्यावर रत्नागिरीत वास्तव्यास असताना त्यांनी सामाजिक सुधारणांची अनेक ऐतिहासिक कार्ये केली.समाजातील चुकीचा रूढीवाद आणि परंपरेवर आळा घातला.जातीभेद,स्त्रीपुरुष भेद सारखे चुकीचे कायदे मोडले आणि सामाजिक समतेचा विचारांचा प्रसार केला.
त्यांनी जातीवाद संपवून विविध जातीच्या लोकांसाठी सहभोजने केली.सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळावे म्हणून पतित पावन मंदिरे स्थापित केले.सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आपण प्रभावित आहोत,असे पाटील म्हणाले. त्यांनी या वेळी त्यांनी सावरकरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले की आजच्या लोकांच्या मनस्थितीला बघून सामाजिक समतेचे सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
 
या वेळी कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, प्रकोष्ठचे संयोजक अमित कुलकर्णी,सहसंयोजक व आदर्श शैक्षणिक संस्था पनवेल या संस्थेचे प्रमुख विसपुते,सहसंयोजक भारत खराटे आणि स्वरदा फडणीस उपस्थित होते.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

नागपुरात 3 मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासह पळाली

LIVE: अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही

अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही!सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अयोध्याहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी ट्रेनची झडती सुरु

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

पुढील लेख
Show comments