Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

river
Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (21:48 IST)
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील नदी परिसरात तसेच उल्हासनगर व कल्याण तालुक्यातील नदीच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.
 
उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेजमधील पाणी पातळीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी असून आता बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीच्या वर १७.२० मीटर इतकी झाली आहे. जांभूळ बंधारा येथील नदीची इशारा पातळी १३ मीटर असून सध्या येथे धोका पातळीच्या वर १४.५७ मीटर इतकी पाणी पातळी आहे.
 
कल्याण तालुक्यातील मोहने बंधारा येथे नदीची इशारा पातळी ९ मीटर असून सध्या येथे ०९.३३ मीटर इतकी पाणी पातळी आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना

LIVE: लाडकी बहीण योजनांवर रामदास कदम यांचे धक्कादायक विधान

चेंबूर लालडोंगर एसआरए प्रकल्पातील समस्यांवर त्वरित कारवाई होणार, मंत्री शंभूराज देसाईंचे आश्वासन

लक्ष्य सेनचे जोरदार पुनरागमन, प्रणॉय ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप मधून बाहेर

WPL 2025: दिल्ली कॅपिटल्स थेट अंतिम फेरीत या संघाशी एलिमिनेटर खेळावे लागेल

पुढील लेख
Show comments