Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयआयटी मुंबईतील हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा

25 students
Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2019 (08:55 IST)
मुंबई येथील आयआयटी हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व मुलींना गोड पदार्थांतून विषबाधा झाली आहे. अन्न विषबाधेने १० नंबर हॉस्टेलमधील २५ मुलींना आयआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार करुन प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्टेलमध्ये सोडण्यात आले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई आयआयटी प्रसिद्ध संस्था आहे. आयआयटी मुंबईमध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेतात. पंचवीस विद्यार्थींनींना हॉस्टेलमधील अन्नातून विषबाधा झाली आहे. आयआयटी हॉस्पिटलकडून हा दावा खोडून काढण्यात आला होता. पण, आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आयआयटी मुंबईकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एच १० या मुलींच्या हॉस्टेलमधील २५ मुलींना विषबाधा झाली होती. मुलीसाठी बनवलेल्या जेवणात गोड पदार्थ सेवन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते, इथली मेस स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली असून पालिकेकडून या मेसची तपासणी केली गेली आहे. सोबतच अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विषबाधेचे कारण अहवालानंतर उलगडणार आहे असे आयआयटी प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments