Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी

Webdunia
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (13:50 IST)
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.
 
पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत झालेला हिंसाचारात केंद्राने जाणीवपूर्वक 72 तासात कारवाई केली नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे. हे प्रकरण पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या वायफळ आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली. या दरम्यान त्यांनी हे प्रश्न मांडले-
 
हे सर्व घडत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते ?
यावर केंद्राने 72 तासात जाणीवपूर्वक कारवाई केली नाही ?
हिंसाचार वाढल्यानंतर निमलष्करी दलांना का पाचारण केले नाही ?
 
सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या जनतेला शांती राखावी अशी अपील केली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments