Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदर्भात उष्णतेची लाट, तमिळनाडूमध्ये चक्रीवादळ धडकणार

Webdunia
शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (10:06 IST)
महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. याची सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून अकोल्यात तापमान 46.3 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान वाढले आहे.
 
दरम्यान, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 46.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोरड्या हवामानामुळे राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कमाल तापमानाने चाळीशी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्येही उष्णतेचा दाह वाढत असून, मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे 42.8 तर मराठवाड्यात परभणी येथे 44.1 अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. कोकणात मात्र, कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 
 
नागपूर येथे 44.3 अंश, परभणी 45, चंद्रपूर 45.4, यवतमाळ 44.5, बुलढाणा 42.5, अमरावती 40.5, जळगाव 43 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले.
 
उत्तर, मध्य भारतात उष्णतेच्या लाटेची स्थिती असताना दक्षिण भारतावर मात्र वर्षातील पहिल्या चक्रीवादळाचे सावट आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती तयार झाली असून, गुरुवारी तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत त्याची तीव्रता चक्रीवादळापर्यंत वाढून ३० एप्रिल रोजी वर्षातील पहिले चक्रीवादळ तमिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानच्या भागाला धडकण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments