Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय तिसरी आघाडी अशक्य

laluprasad chara ghotala
Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (12:52 IST)
चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना रांचीतून दिल्ली येथे उपचारासाठी आणले गेले. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना तिसर्‍या आघाडीबाबत विचारले, तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय तिसरी आघाडी अशक्य आहे असे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केले. भाजपविरोधात एकजूट करायची असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.
 
अखिलेश यादव आणि मायावती हे एकत्र आल्याचा मला आनंद झाला, अशीही प्रतिक्रिया लालूप्रसाद यांनी दिली. तिसर्‍या आघाडीबाबत त्यांना विचारले असता मी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय मानूच शकत नाही, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. कारण काँग्रेसचे नेतृत्व असेल तरच तिसर्‍या आघाडीला दिशा मिळेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments