Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या या राज्यात पेट्रोल 170 रुपये लिटर, गॅस सिलिंडर 1800 ला विकले जात आहे , अशी परिस्थिती का? जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 25 मे 2023 (18:26 IST)
नवी दिल्ली. या महिन्याच्या सुरुवातीला पसरलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्याबाहेरील वस्तूंच्या आयातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने उपलब्ध होत आहेत. मणिपूरच्या बहुतांश भागात सिलिंडर, पेट्रोल, तांदूळ, बटाटे, कांदे आणि अंडी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.
 
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक मांगलेम्बी चानम यांनी सांगितले की, “पूर्वी 50 किलोची तांदूळ 900 रुपयांना मिळत होती, पण आता ती 1800 रुपयांना उपलब्ध आहे. बटाटा आणि कांद्याच्या दरातही 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.
 
बटाटा 100 रुपये किलोपर्यंत विकला जातो
काळ्या बाजारात गॅस सिलिंडर 1800 रुपयांना मिळतो, तर अनेक भागात पेट्रोलची किंमत 170 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे, असे चनम यांनी सांगितले. ते म्हणाले, “अंड्यांची किंमतही वाढली आहे. 30 अंड्यांचा एक क्रेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता 300 रुपयांना मिळत आहे. ते म्हणतात की जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सुरक्षा दलांनी कडक निगराणी ठेवली आहे, अन्यथा किंमती आणखी वाढू शकल्या असत्या. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या आगमनापूर्वी बटाट्याचे भाव 100 रुपये किलोवर गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments