Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधुनिक काळातले कौरव हाफपँट घालतात - राहुल गांधी

Webdunia
मंगळवार, 10 जानेवारी 2023 (08:15 IST)
"21 व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? 21 व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत," असं म्हणत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली आहे.
 
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल बोलत होते. यात्रा सध्या हरियाणात आहे, तिथे राहुल बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
 
"संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत", असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

पुढील लेख
Show comments