Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले ,कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर

Webdunia
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (12:52 IST)
तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंबंधीचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ते सभागृहाच्या पटलवर ठेवले. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या गदारोळात तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यासाठी लोकसभेने कृषी कायदे निरसन विधेयक, 2021 चर्चेविना मंजूर केले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याचे फायदे कुठेतरी शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आपण यशस्वी होऊ शकलो नाही, असे ते म्हणाले होते.

कृषी कायद्यांबाबत काँग्रेसचे संसद भवन परिसरात निदर्शने 
आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमलेल्या काँग्रेस सदस्यांनी मोठा बॅनर हातात घेतला होता, ज्यावर इंग्रजीत लिहिले होते- आम्ही काळे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो.ते सरकारविरोधी घोषणा देत होते.
आंदोलकांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा आणि लोकसभेच्या अनेक सदस्यांचा समावेश होता. 
विशेष म्हणजे सरकारने तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे हित जपल्याशिवाय पक्ष स्वस्थ बसणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, संसदेच्या पहिल्या दिवशी सकाळी दिवंगत माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments