Marathi Biodata Maker

हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही

Webdunia
बुधवार, 1 मे 2019 (17:01 IST)
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे.गडचिरोलीतील हल्ला हा भ्याड असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सांत्वना व्यक्त करतो असंही सिंह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments