rashifal-2026

राहुल गांधी रेल्वे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करीत म्हणाले प्रवाशांचे कोणी ऐकत नाही

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (08:48 IST)
रेल्वे व्यवस्था बिघडत असून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच ते म्हणाले की, जनतेचे कोणी ऐकत नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित केला असून दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवासात अनेकांना येणाऱ्या समस्यांचा दाखला देत त्यांनी मंगळवारी दावा केला की, रेल्वे व्यवस्था कोलमडत असून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ आहे. यावेळी लोकांचे कोणी ऐकणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.
 
तसेच राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले की भारताला उत्कृष्ट रेल्वे सुविधांची गरज आहे जी सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. तसेच ते म्हणाले की, "आज बालासोर ते वांद्रेपर्यंत आमची रेल्वे व्यवस्था मोडकळीस आली आहे आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ आहे. ज्या वेळी लोकांचे ऐकले पाहिजे, तेथे कोणीही ऐकणार नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले, "मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, एक चांगला भारत घडवण्यासाठी तुमचा आवाज उठवा असे देखील ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments