Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी यांनी दलित महिलेशी करावा विवाह: रामदास आठवले

Webdunia
गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (13:03 IST)
आपल्या मजेशीर वक्तव्यांमुळे प्रसिद्ध केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे की त्यांनी आता विवाहबद्ध व्हावं आणि एखाद्या दलित महिलेशी लग्न करावे.
 
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यांबाबत नुकतीच 'हम दो हमारे दो' अशी कोपरखळी मारली. त्यावरून आठवले यांनी राहुल गांधी यांना अशाच मिश्किल शब्दात उत्तर दिलं आहे.
 
रामदास आठवले म्हणाले की माझे चांगले मित्र राहुल हे सध्या 'हम दो हमारे दो' विषयी बोलत आहेत. हे घोषवाक्य कुटुंब नियोजनाबाबत वापरलं गेलं होतं. आता राहुल गांधी यांना 'हम दो हमारे दो' पाहिजे असतील तर त्यांनी लग्न केलं पाहिजे. तसेच त्यांनी दलित महिलेशी लग्न केलं, तर महात्मा गांधींनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लागेल. त्याच्या या पावलामुळे जाती निर्मूलनही होऊ शकेल तसेच सर्व तरुणांनाही एक दिशा मिळेल.
 
आठवले पुढे म्हणाले की केंद्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची मदत करतं. राहुल गांधी यांना आम्ही या योजनेचाही लाभ मिळवून देऊ. त्यांनी दलित महिलेलाच जोडीदार म्हणून निवडावे असा सल्ला आठवले यांनी दिली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments