IMD Alert On Rain:भारतीय हवामान खात्याने सांगितले की 16 मे नंतर दिल्ली आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असून उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो. तसेच उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरूच आहे. राजस्थान आणि विदर्भात या महिन्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, पश्चिम राजस्थान आणि विदर्भातील सुमारे 7-8 स्थानकांवर तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस राहते. उष्णतेची लाट कायम असून ती पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार आहे. याशिवाय पश्चिम मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.