Dharma Sangrah

राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला, १४२ रुग्णांना बाधा

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2022 (21:08 IST)
मुंबईत  कोरोनाच्या रुग्णांच्या  संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे स्वाइन फ्लूने डोकं वर काढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यत १४२ रुग्णांना बाधा झाली आहे. तसे, सात जणांचा मृत्यू झाला.
 
काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. त्यानुसार, राज्यात ८ जूनपर्यंत ८ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती.
 
जुलैपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढला आहे. गेल्या १० दिवसांत स्वाइन फ्लूचे १२६ रुग्ण आढळले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
 
राज्यात आतापर्यत आढळलेल्या रुग्णामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. रुग्णसंख्या जास्त असली तरी मुंबईत मृतांची संख्या मात्र शून्य नोंदली आहे. मुंबईनंतर पुण्यात २३, पालघर २२, नाशिक १७, नागपूर महापालिका १४, कोल्हापूर महापालिका १४, ठाणे महापालिका ७ आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक तीन मृत्यू कोल्हापूरमध्ये झाले. पुणे आणि ठाणे महापालिकेत प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख