Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कामाच्या ताणमुळे पुणे महानगरपालिकेतून 71 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला

Webdunia
सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (09:45 IST)
पुणे महापालिकेचे कर्मचारी कामाच्या ताणामुळे हैराण झाले असून यासाठी वेगवेगळी कारणे सांगून सर्वांनी राजीनामे दिले आहे. काही लोकांनी स्वत:च्या इच्छेने निवृत्तीही घेतली आहे. अशी मोठी बातमी समोर आली आहे. 
 
सन 2024 संपायला आले असून अजून दोन महिने बाकी आहे. यंदा 71 कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिकेतून राजीनामा दिला असून 13 कर्मचाऱ्यांनीही स्वत:च्या इच्छेने सेवानिवृत्ती घेऊन मुदतपूर्व नोकरी सोडली आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार नोकरी सोडणाऱ्यांमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे. नोकरी सोडण्यामागे कामाचा ताण, कामातील बदल, आरोग्य आणि मानसिक समस्या ही कारणे कर्मचाऱ्यांनी सांगितली आहे.
 
2022 मध्ये भरतीवरील बंदी उठल्यानंतर, 135 कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात आली आणि सर्व विभागांमध्ये एकूण 448 विविध पदे भरण्यात आली. तसेच दोन टप्प्यातील भरतीमध्ये सुमारे 808 पदे भरण्यात आली होती, ज्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता, अग्निशमन दलाचे सहायक अतिक्रमण विरोधी निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि इतर दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात राजीनामा दिला. आता त्यामुळे 71 पदे रिक्त झाली आहे. प्रशासकीय अधिकारींनी सांगितले की, राजीनामा दिलेल्यांपैकी बहुतेक जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि काहींना चांगल्या नोकऱ्या मिळाल्यामुळे त्यांनी पीएमसीचा राजीनामा दिला.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

नागपूरच्या कोतवालबुडी येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोटात दोघांचा मृत्यू

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

बाळ दूध पीत नाही, नैराश्यात येऊन आईने घेतले टोकाचे पाउल, नागपुरातील घटना

पुढील लेख
Show comments