Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात लम्पी आजाराचा शिरकाव, मावळात 20 जनावरांना लागण

Webdunia
रविवार, 11 सप्टेंबर 2022 (13:42 IST)
राज्यात आता लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मावळातील उर्से गावात 20 जनावरांना या रोगाची लागण लागली असून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाह्य कीटक ने या रोगाचा प्रसार होतो. या आजारामुळे जनावरांना ताप येऊन त्यांच्यातील दूध देण्याची क्षमता कमी होते. शासनाच्या नियमानुसार, जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरु होऊन या क्षेत्रातील पाच ते दहा किलोमीटर पर्यंत लसीकरण सुरु केले आहे. या आजारामुळे जनावरे चारा खात नाही आणि ते मरण पावतात. या साठी त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे.

नवलाख उंब्रे, जाधववाडी, मेंढेवडी, या गावात लक्ष जास्त दिले आहे. आतापर्यंत चार हजार आठशे त्रेंशी जनावरांच्या लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे. लम्पि स्किन विषाणू या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसते. त्यामुळे रोगी जनावरे अधिक अशक्त होतात.

सध्या मावळात सुमारे 52 हजार पशु आहेत. मावळच्या उर्से येथे या चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्याचा दृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्गचे प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार, प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगांबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जनावरांमध्ये या रोगाचे लक्षण आढळ्यास घाबरून न जाता त्यांना तातडीने औषधोपचार करावे .
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments