Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने भांडण, बायकोची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (15:09 IST)
नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत तब्बल तीन दिवस वाद सुरू होता.अखेर बायकोने या वादानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
 
प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत प्रकाश भिसे (वय 55) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत प्रतीक्षा आणि गहिनीनाथ यांचे 2019 मध्ये लग्न झाले होते. या दोघांनाही एक मुलगा आहे.गहिनीनाथ पुण्यातील एका चांगल्या कंपनीत कामाला होता.बायको मात्र बीड जिल्ह्यातील गावात राहत होती.काही दिवसांपूर्वी त्याने बायकोला पुण्यात आणले होते.

तीन दिवसांपूर्वी कामावरून घरी परत जात असताना गहिनीनाथने पाणीपुरी नेली होती.परंतु घरी गेल्यानंतर मला न विचारता पाणीपुरी का आणली असे सांगत प्रतिक्षाने भांडण करण्यास सुरुवात केली.याच कारणावरून त्यांच्यात मागील दोन दिवसांपासून वाद सुरू होते.याच वादातून प्रतिक्षाने शनिवारी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना रविवारी तिचा मृत्यू झाला.भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments