Marathi Biodata Maker

रिक्षाचालकांच्या अडचणींत वाढ, रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल; काय आहे नेमके कारण

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:26 IST)
पुणे : बाईक टॅक्सीविरोधामध्ये पुण्यातील रिक्षा चालकांनी बेमूदत आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
 
अधिक माहितीनुसार, ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेसह अनेक संघटना रिक्षा बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. सोमवारी (दि. 28) संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. ‘बघतोय रिक्षावाला’संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदेशीरपणे टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर तशी याबद्दल घोषणा करण्यात आली होती. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसामध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसामध्ये बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाणार आहे. परंतु आता आंदोलनामध्ये सहभागी २ हजार ५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
 
विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, बाबा कांबळे, यामध्ये केशव क्षीरसागर, आनंद अंकूश यांच्यावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी पुण्यामध्ये हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते. कलम ३४१नुसार अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments