Festival Posters

रिक्षाचालकांच्या अडचणींत वाढ, रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल; काय आहे नेमके कारण

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:26 IST)
पुणे : बाईक टॅक्सीविरोधामध्ये पुण्यातील रिक्षा चालकांनी बेमूदत आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
 
अधिक माहितीनुसार, ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेसह अनेक संघटना रिक्षा बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. सोमवारी (दि. 28) संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. ‘बघतोय रिक्षावाला’संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदेशीरपणे टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर तशी याबद्दल घोषणा करण्यात आली होती. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसामध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसामध्ये बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाणार आहे. परंतु आता आंदोलनामध्ये सहभागी २ हजार ५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
 
विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, बाबा कांबळे, यामध्ये केशव क्षीरसागर, आनंद अंकूश यांच्यावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी पुण्यामध्ये हजारो रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते. कलम ३४१नुसार अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments