suvichar

अर्ध्या रात्री डाव साधला; येरवडा तुरुंगातून पाच कैदी फरार

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (12:16 IST)
पुण्यातील येरवडा तुरुंगातून बुधवारी मध्यरात्री पाच कैदी फरार झाल्यानं खळबळ उडाली आहे. देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो अशी पळालेल्या कैद्यांची नावे आहेत.
 
तुरुंग प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील पाचव्या खोलीत हे पाच जण होते. रात्रीच्या सुमारास खोलीच्या खिडकीचे गज उचकटून व तोडून टाकून ते पळून गेले. हा प्रकार घडला तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयश जोशी व नितिन शिंदे हे त्यावेळी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. पळून गेलेल्यांपैकी तिघे दौंड तालुक्यातील रहिवासी असून एक हवेली तालुक्याचा तर एक पुणे शहरातील राहणारा आहे. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार दौंड, लोणी-काळभोर व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट, पुढील तीन दिवस दिलासा नाही

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! बाजार उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहराचे भाव तपासा

निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेला नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सादर होणार

"माझा भाऊ म्हणून ऐक..." जरांगे पाटलांसमोर भाजप आमदार भावूक; धमकीच्या फोननंतर अंतरवालीत नेमकं काय घडलं?

LIVE: नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments