Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune: भरधाव कारने 5 शेतमजुरांना चिरडले, तिघांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (11:57 IST)
कल्याण -अहमदनगर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याची घटना घडली असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहे. 
 हा अपघात कल्याण- अहमदनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यात डिंगोरे हद्दीत शेतातील कामे उरकून पायी चालत जात असलेल्या शेतमजुरांना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासणीत कळाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हे शेतमजूर मध्यप्रदेशातून मजुरीसाठी आले होते. शेतीचे काम उरकून ते पायी चालत जात असताना हा अपघात झाला. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले वाढले, अमेरिकेचा इशारा

आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार का? पीटी उषाच्या प्रस्तावावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

पुढील लेख
Show comments