Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली, 15 मेनंतर निर्णय होणार

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (21:25 IST)
पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणी कपातीची तलवार तूर्तास तरी टळली आहे. पुणे ग्रामीण आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे  याबाबत 15 मेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
पुणे शहरात पाणी कपात करायची की नाही, यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.  पुणे शहराला आणि ग्रामीण भागात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती, असे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले गेले. त्यानंतर पुण्यात 15 मेपर्यंत तरी पाणी कपात करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना यांमुळे दिलासा मिळाला आहे.
 
पुणे शहराला ज्या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणामध्ये 1.07 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 3.41 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 6.75 टीएमसी, टेमघर धरणामध्ये 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments