rashifal-2026

भाजपचा तिसरा उमेदवार शंभर टक्के जिंकणार, - चंद्रकांत पाटील

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (21:39 IST)
राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून निवडणूक बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. भाजप सहाव्या जागेसाठी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. यामुळे शिवसेना विरुध्द भाजप  असा थेट सामना रंगणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी आणि आमच्यात तासभर चर्चा झाली. तिसरी जागा मागे घ्या, असे ते म्हणत होते. त्याबदल्यात विधान परिषदेची एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा होता. त्यावर तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढवणार नाही, असा प्रस्ताव आम्ही दिला. त्यानंतर आमचा कोणताही संवाद झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
 
पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडेही नाहीत आणि आमच्याकडेही नाहीत. पण, आमच्याकडे विजयासाठी लागणारी 12 मते आहेत. इतर पक्षाच्या उमेदवाराशी आमचा संपर्क नाही. पण, ब्रँडेड मते आम्हाला पडतील, असा सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपचा तिसरा उमेदवार 100 टक्के जिंकणार असल्याचा विश्वासही पाटलांनी व्यक्ता केला.
 
तर, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर आपली मते सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना सुरक्षित हॉटेलवर ठेवण्याची चर्चा आहे. तर, आमचा माणसाच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

संख्याबळाबाबतीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडं पहिल्या पसंतीची 30 मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या जोरावर धनंजय महाडिकांना विजय मिळवून देऊ, असे त्यांनी म्हंटले आहे. घोडेबाजार करणार नाही, असेही पाटलांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments