rashifal-2026

42 मतांचा कोटा संभाजीराजेंना देण्यास तयार, पण...,"

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (21:09 IST)
संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती  यांना शिवसेनेने  पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर आता मुंबईसह  राज्यातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली असून संभाजीराजेंचा सन्मान म्हणूनच आम्ही त्यांना शिवसेनेच्या कोट्यातली जागा द्यायला तयार झालो, असं सांगताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या कोट्यातली जागा संभाजीराजेंना द्यायला तयार झालो, तो त्यांचा सन्मान म्हणूनच. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? ४२ मतं आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. आमची अट नाही पण भूमिका एवढीच की तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा.
 
राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातलं कोणी जात नाही हा समर्थकांचा दावा योग्य नाही. संभाजीराजेंना पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. राजघराण्यातले अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आले आहेत, पक्षांकडून लढले आहेत. सिनियर शाहू महाराजही शिवसेनेत आले होते.
 
संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावरून आता चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सीट कन्फर्म झाली आहे की वेटिंग लिस्टमध्ये आहे याची पुष्टी करणारा संदेश १० तास आधी येणार; रेल्वेने एक नवीन चार्टिंग सिस्टीम लागू केली

LIVE: पोर्श कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह आठ आरोपींचा जामीन फेटाळला

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली

आचारसंहिता लागू होताच बीएमसीने कारवाई सुरू केली, मुंबईत राजकीय पोस्टर्स आणि बॅनर हटवले

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठीत घोषणा अनिवार्य करावी; नाना पटोलेंची पंतप्रधान यांना मागणी

पुढील लेख
Show comments