Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चौरागढ महादेव दर्शनासाठी निघालेल्या 3 भाविकांचा कार अपघातात मृत्यू , एक जखमी

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. रामपूर-सारणी रस्त्यावर दमुआजवळ हा अपघात झाला. झिरीघाटाजवळील सुरक्षा भिंतीला तरुणांची कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चुरडा झाला.
 
नागपूरच्या वर्धा जिल्ह्यातील चार तरुण  चौरागढ महादेव मेळ्याला भेट देण्यासाठी जात होते . सोमवारी सकाळी 4 ते 6 च्या दरम्यान हे लोक दमुआ येथून रामपूर तांसी रस्त्यावरून निघाले. येथे दमुआच्या सात किमी पुढे शंकर मंदिराजवळील वळणावर बांधलेल्या सुरक्षा भिंतीला कार धडकली. या अपघातात तुषार नयनेश्वर झामडे (24) किणी आष्टी जिल्हा वर्धा, अक्षय प्रदीप धोखडे (26) तिवसा अमरावती आणि दीपक भावरावजी डाखोडे (25) आष्टी जिल्हा वर्धा या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथा तरुण अक्षय देविदास कुडापे (17)किणी आष्टी जिल्हा वर्धा हा गंभीररित्या जखमी झाला.
 
 कार वेगाने धावत होती. कार तुषार चालवत होता. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याला काही समजले नाही आणि कार थेट सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच दमुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि जखमी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दमुआ टीआय दीपक बावरिया यांनी सांगितले की, कार चालवताना तुषार हा दारूच्या नशेत होता, त्यामुळे हा अपघात झाला. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments