Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षेला जाणाऱ्या 3 विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (16:15 IST)
जालना येथील घनसावंगी येथे शुक्रवारी एका भीषण अपघात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 
 
अंबर रोडवर सकाळी विद्यार्थी असलेली कार घनसावंगी येथील पेट्रोल पंपासमोर जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटले. ज्यामुळे कार रस्त्यालगतचं पलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एका व्यक्तीला जबर मार लागल्याने त्याला जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. 
 
अपघातात गाडीचेही संपूर्णपणे नुकसान झाले आहे. अपघातात मृत्यू पावलेले तिघेही विद्यार्थी आहेत. आरती मिरकर (वय 25) सुनील जाधव (वय 30) आणि वंदना राजगुरू (वय 24) असं या तिघांचं नाव आहे. शिक्षण घेत असलेले हे तिघेही टायपिंगची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. जखमीला उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments