Festival Posters

पालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:16 IST)
शिर्डीहून आळंदीला जाणा-या पालखीत कंटेनर घुसल्याने चिरडून चार वारक-यांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ब-याच जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर ही घडली. पायी चालणा-या वारक-यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारक-यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
 
अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.
 
जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोरे (रा. माळी ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी सूर्य, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर) यांचा समावेश आहे.
 
मृतांची नावे
-बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव)
-बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
-भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)
-ताराबाई गंगाधर गमे (रा.को-हाळे, ता. राहता)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments