Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाख मदत

Webdunia
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (09:07 IST)
संपूर्ण भारत आज उद्विग्न आहे. सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. जम्मू व काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश आहे, असे सांगून या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत व कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकिस्तान आगळीक करत असून, त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे प्रतिपादित करून त्यांनी शहीद जवानांच्या प्रती आदरांजली व्यक्त केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments