Marathi Biodata Maker

राज्यात आणखी ८ स्पेशल ट्रेन धावणार

Webdunia
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (08:23 IST)
मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, मुंबई-नांदेड या रेल्वे धावणार आहेत. याआधी मुंबईहून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसाठी काही गाड्या  सुरु होत आहेत. 
 
मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी दररोज धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यात चार दिवस धावणार आहे. ही सुपरफास्ट विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी  लातूरसाठी रवाना होईल. तसेच ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे.
 
पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच पुण्यातून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक आणि पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. तर अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक सोडण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमधून गोंदियासाठी गाडी सोडण्यात येणार आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया विशेष दररोज गाडी धावेल. 
 
तसेच  मुंबई- हजूर साहिब नांदेड विशेष दररोज गाडी धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लातूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा असे थांबे असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments