Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (22:05 IST)
राज्यात पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथकाला जाग आली आहे. केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, रायगड आणि सांगली, चिपळूणमधील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आले आहे. उद्या केंद्रीय पथक तब्बल अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार आहे.
 
राज्यातील घटनेला दोन ते अडीच महिने झाले आहेत. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे दरड कोसळल्या आहेत. या सगळ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणी दौरा करत आहेत. केंद्रीय पथकाचा दौरा खेड, चिपळूणमधील पुरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीमध्ये दुपारी केंद्रीय पथक दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेईल. मिरज तालुका आणि इतर भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर पथक येणार आहे तर पाहणी काय करणार असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुढील लेख
Show comments