Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर राज्य सरकारने १३२८ बळींची दखल घेतली

Webdunia
बुधवार, 17 जून 2020 (10:26 IST)
आयसीएमआरच्या नियमावलीनुसार राज्य सरकारने मुंबईत झालेले तब्बल ९५० कोरोना बळींची माहिती दडवल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. खुद्द आयसीएमआरने देखील अशा ४५० मृत्यूंचा उल्लेख केला होता. अखेर या मृतांच्या आकडेवारीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली असून  एकूण १३२८ अतिरिक्त बळींची नोंद राज्य सरकारने घेतली आहे. यामध्ये मुंबईतले ८६२ मृत्यू तर राज्याच्या इतर जिल्ह्यात झालेल्या ४६६ मृत्यूंचा समावेश आहे.
 
यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार? हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे’. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर राज्य सरकारने हे १३२८ मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments