Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर नवरी पसंत नाही म्हणणार्‍या मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (15:53 IST)
औरंगाबाद- विवाह संपन्न झाला आणि नंतर नवरदेव म्हणाला की मुलगी पसंत नाही, तिला सोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याने नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले. वरात घेऊन आलेल्या गाड्या फोडल्या आणि इतका वाद घडल्यानंतर नवरीला न घेताच वर्‍हाड मुंबईला निघून गेले. नंतर मुलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावण्यात आले. हे सर्व फिल्मी नसून खरंच घडले आहे.
 
नेमकं काय घडलं?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका मुलीचा विवाह मुंबईतील मुलासोबत बुधवारी आयोजित केलं गेलं होतं. गांधेली येथे सोहळा पार पडणार होता कारण मुलीचे मामा आणि बहीण येथे राहतात. लग्नासाठी मुंबईहून वरात आली. लग्न लागण्याआधीच वऱ्हाडीतील अनेक जण दारू प्यायले होते. दुपारी साडेबारा वाजताचा मुर्हूत असूनही 3 वाजेपर्यंत लग्न लागले नव्हते कारण वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत असल्याने लग्नाला उशीर होत होता.
 
विनवण्या केल्यानंतर लग्न लागले मात्र वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घालायला सुरुवात केली. ठरल्यानुसार पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केल्यावर नवरदेवाच्या नातेवाइकांनी नवरीच्या मेहुण्याला मारहाण केली. यावरून वाद विकोपाला गेला.
 
नंतर मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाद मिटल्याचे वाटत असल्यानंतर वऱ्हाड निघण्याच्या वेळेस नवरदेवाने मुलगी पसंत नाही म्हणून सोबत नेणार नाही असे सांगितले. यामुळे नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली, गाड्या फोडल्या. दबाव घालूनही जेव्हा नवरा नवरीला घेऊन गेला नाही तेव्हा अशा नवऱ्यासोबत नांदण्यास वधूने विरोध केला. नंतर मुंबईच्या वऱ्हाडींना परत पाठवून लगेच दुसरा मुलगा शोधून मुलीचं रात्री साडेनऊ वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments