Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन दिवसांनंतर राज्यात वाढणार थंडीचा कडाका: उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील तापमानामध्ये घसरण

Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:28 IST)
राज्यात तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात हळूहळू घसरण होत असल्याने थंडीत वाढ होत आहे. आगामी दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, निफाड, जळगाव येथे किमान तापमानात घसरण झाल्याने गारठा वाढला आहे. शुक्रवारपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमानात घसरण झाल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात मिथिली चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याचे केंद्र हे ओडिशाच्या परादीपपासून 250 किलोमीटर दूर आहे. मात्र, या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार नाही.
 
प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सियस):
निफाड 12 उदगीर 17 बीड 18 धाराशिव 18 माथेरान 19 बारामती 15 सोलापूर 19 नाशिक 14 अहमदनगर 13 पुणे 15 परभणी 18 कोल्हापूर 19 महाबळेश्वर 16 जळगाव15 सातारा 16 छत्रपती संभाजीनगर 16
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

रोहित शर्मावर विनोद काँग्रेस प्रवक्त्या शमा यांना महागात पडला, बीसीसीआयने दिले चोख उत्तर

Baba Vanga Prediction तिसऱ्या महायुद्धापासून जगाच्या अंतापर्यंत, बाबा वेंगा यांच्या ५ धक्कादायक भाकिते

LIVE: माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार,विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

ठाण्यात महावितरण अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना अटक

यूपीच्या शहजादी खानला यूएईमध्ये फाशी देण्यात आली,परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली

पुढील लेख
Show comments