Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:38 IST)

उल्हासनगरच्या विकास आराखड्याचा प्रश्न आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलाी यांनी सभागृहात उपस्थित केला. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी उल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शहरात होणाऱ्या ३६ मीटरच्या रिंगरोडमुळे अनेक लोकांना बेघर व्हावे लागणार आहे. या रिंगरोडमुळे व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याचीही भीती आहे. हा विकास आराखडा फक्त बिल्डरांसाठी आखला गेला आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द केला जाणार का असा सवाल ज्योती कलानी यांनी उपस्थित केला.

ज्योती कलानी यांच्या मुद्द्यांचे समर्थन करत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी याविषयी लोकप्रतिनिधी, तज्ज्ञांच्या सहाय्याने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सभागृहात केली. यावर अधिवेशनानंतर लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments